ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आपण भुरटयांनां आदर्श मानतोय का ? संदीप झरेकर.

काय झालंय काय आपल्या समाजाला ? पालकांनो वेळीच सावध व्हा…

प्रतिनिधी /जयश्री एडके.

लातूर :- अतिशय शिवराळ भाषा वापरून त्याचे व्हिडिओ पोस्ट करणारी कुठलीतरी थेरगाव ची स्वयंघोषित Queen आणि तिला ७०००० फॉलोवर्स.कच्चा बदाम गाण्यावर अतिशय बीभत्स अंगविक्षेप करणाऱ्या कोणातरी अंजली राय ला ३ मिलियन लाईक्स.
गळ्यात किलो किलो सोनं घालून फिरणारे गुंठामंत्री गोल्डमॅन आणि त्यांच्या सोबत फिरणारी कंगाल पोरांची टोळी.चित्रविचित्र व्हिडिओ पोस्ट करून आपली तारीफ करण्याची हौस दुसऱ्याकडून भागवून घेणारी सुमार दिसणारी ऑंटी आणि तिच्या प्रोफाईलवर लाळ टपकवणारे भुकेले तरुण आणि म्हतारे.

रोज एखादा नवीन शेर किंवा वाक्ये इंटरनेट वरून चोरून attitude मध्ये काढलेला स्वतःचा फोटो बॅकग्राऊंड ला ठेऊन पोस्ट करणारे चोरटे मोटिवेटर/मेंटॉर .एखादया subject मध्ये जेमतेम शिक्षण झालेले पण स्वतःला त्याचा स्वतःच एक्स्पर्ट घोषित करणारे स्वयंघोषित भूरटे किंग आणि त्याचे निर्बुद्ध भक्त.

टपोरी भाषेत सामाजिक घटनांवर आपले टोकाचे निर्बुद्ध विचार मांडणारा कोणीतरी हिंदूस्थानी भाऊ आणि त्याच्या अवाहनाला प्रतिसाद देऊन कायदा हातात घेऊन गून्हा दाखल झाल्यावर आपल्या मध्यमवर्गीय बापाचा रक्तदाब वाढवणारे दिवटे.
काय झालंय काय आपल्या समाजाला हिमालय एवढी माणसं होऊन गेली असताना या गोट्यानंच आदर्श म्हणतोय का आजचा तरुण.
मला या सोशल मीडिया डार्लींग बद्दल फार काही वाटत नाही पण त्यांना follow करणाऱ्यांचा काय?

संत तुकारामसारखा जगतगुरु, छत्रपती शिवाजी महारांजांसारखा महापुरुष, किर्लोसकरांसारखा उद्योगपती, कर्मवीर भाऊराव पाटील यासारखे शिक्षण महर्षी असे असंख्ये महात्मे जन्माला घालणारी हि माती एवढी निर्बुद्ध पिढी कशी काय निर्माण करू शकते.
पालकांनो वेळीच सावध व्हा काळ फार बिकट येईल असा वाटत आहे…!!

शेवटी तुकारामांनी म्हणूनच ठेवलंय
काय देवापाशीं उणें ।
हिंडे दारोदारीं सुनें ।।१।।
करी अक्षरांची आटी ।
एके कवडी च साठी ।।२।।
निंदी कोणा स्तवी ।
चिंतातुर सदा जीवी ।।३।।
तुका म्हणे भांड ।
जळो जळो त्याचे तोंड ।।४।।.

प्रा.संदीप झरेकर.

तुलसी धाम,लातूर.

error: Content is protected !!