ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणार-रविकांत तुपकर यांचा गंभीर इशारा

सोयाबीन-कापूस प्रश्नासाठी तुपकरांचा आक्रमक पवित्रा

गणेश जाधव|संपादक
सोयाबीन-कापसाच्या प्रश्नाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाभर बैठका, सभा घेतल्या. त्यानंतर बुलढाण्यात विक्रमी असा एल्गार मोर्चा धडकला. हजारो शेतकरी, महिला, युवक या मोर्चात रस्त्यावर उतरले, त्यातून शेतकऱ्यांचा रोष दिसून आला परंतु तरीही केंद्र आणि राज्य सरकार सोयाबीन – कापसाच्या प्रश्नावर अद्यापही गंभीर नाही, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता आरपारची लढाई लढायची असे म्हणत हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.त्यांच्या या इशाऱ्याने राज्यभर चांगलीच खळबळ उडाली आहे.सोयाबीन -कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या काही काळापासून सातत्याने लढा देत आहेत. गतवर्षी त्यांनी राज्यभर आंदोलन पेटविले होते, त्याचे फलीत शेतकऱ्यांना मिळाले होते. दरम्यान वर्षी देखील त्यांनी सोयाबीन-कापसाच्या प्रश्नासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. गावोगावी बैढका, सभा, मेळावे घेऊन त्यांनी सोयाबीन-कापूस आंदोलनाचे वातावरण तयार केले. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी बुलढाण्यात शेतकऱ्यांचा विराट असा एल्गार मोर्चा धडकला. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाचे गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्यानंतर आठ दिवसांचा अल्टीमेटम रविकांत तुपकर यांनी दिला होता. परंतु या कालावधीत राज्य आणि केंद्र सरकारने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आणि ठोस असा निर्णय घेतला नाही त्यामुळे आता रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जीव गेला तरी मागे हटायचे नाही असा निर्धार करत झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी तुपकर तयार झाले आहेत. हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी,खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे,शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्जात वळती करु नये आदी मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहे. सदर मागण्यांबाबत २२ नोेव्हेंबरपर्यत निर्णय न झाल्यास २३ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी, कार्यकर्ते मुंबईकडे कूच करतील आणि २४ नोव्हेंबर रोजी सकाळी मंत्रालया शेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरुन अरबी समुद्रात जलसमाधी घेतील, असा गंभीर आणि निर्वाणीचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सरकारला दिला अजून आठ दिवसांचा वेळ…

सध्या रब्बीचा हंगाम सुरु आहे. हरभरा, गहू पेरणीत शेतकरी व्यस्त आहेत. शिवाय कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोयाबीन-कापूस पट्ट्यात आहे. अशावेळी आपल्या आंदोलनामुळे भारत जोडो यात्रेत व्यत्यय येवू नये व कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यामुळे सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला आणखी आठ दिवसांचा वेळ दिला आहे, जर 22 नोव्हेंबर पर्यंत सरकाने निर्णय न घेतल्यास 24 नोव्हेंबरला मात्र आरपारची लढाई लढू, अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

error: Content is protected !!