ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

परमार्थ केला तरच होतो, संसार नाही केला तरी होतो – महंत श्रीरंग महाराज डोंगरे

परमार्थ केला तरच होतो, संसार नाही केला तरी होतो – महंत श्रीरंग महाराज डोंगरे
मादळमोही । प्रतिनिधी;-  गेवराई तालुक्यातील तांदळा येथे वैकुंठवाशी हभप. महंत महादेव महाराज श्री क्षेत्र नारायणगड यांची तांदळा येथे गेल्यावर्षी मृर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यानिमित्ताने प्रत्येक महिना वारी एकादशीच्या दिवशी येथे हरिकीर्तन असते त्या अनुशंगाने दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ९ ते ११ यावेळत हभप महंत श्रीरंग महाराज डोंगरे, श्रीक्षेत्र संस्थान घोलपदरा यांच्या मधूर वाणीतून अमृततुल्य हरी कीर्तन पार पडले.
      तालुक्यातील तांदळा येथे कामदा एकादशी महीनावारी निमित्ताने हभप महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांनी देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ।। ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ।। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील पहिला क्रमांकाचा अभंग घेतला यावेळी महाराजांनी बोलताना सांगितले, माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच जिवणाचा सार समजून येतो. किमान क्षणभर देवाच्या समोर हात धरून डोळे मिटून त्या वातावरणाचा अनुभव घेतला त्यांना अनुभूती येते. देव भक्तीचा भुकेला असतो आणि परमार्थाचे कुठे मोजमाप होऊ शकत नाही. इथे अर्धवट परमार्थ  कमी येत नाही. तसे संसार अर्धवट केला तरी होतो आणि नाही केला तरी होतो पंरतु परमार्थ केला तर होतो. संसार करत असताना मुलीने सासूला आई समान मानावे आणि सासूने सुध्दा सुनेला मुली सारखे वागावे. रंग वर्णावरून दिसते रुप आणि मरणोत्तर दिसते ते स्वरूप जीवनात एकदातरी राम नामस्मरण करा. संसारात पैसा किती कमवला तरी सुख नाही एकदा रामाचे नामस्मरण केले तरीही मनाला सुख प्राप्ती होते. या कीर्तन सेवेसाठी तांदळा येथील संदिपान शेंबडे, अभिमान शेंबडे, भाऊसाहेब शेंबडे यांनी योगदान दिले तर गावातील महिला पुरुष वारकरी टाळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!