ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

घराघरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने ८ जुनला नारायणगडावर यावे – मनोज जरांगे 

अंमळनेर दि.२३ (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करा हे सांगणार नाही, परंतु ज्याला पाडायचे त्याला ईतके ताकतीने पाडा की त्यांच्या पाच पिड्या निवडणुक लढणार नाहीत ईतक्या मताने पाडा असे अवाहन करीत विधानसभेला राज्यात ९२ मतदार संघावर मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने विधानसभा निवडणुकीत संपुर्ण ताकतीने उतरणार असल्याची घोषणा मराठायोद्धा मनोजदादा जरांगे यांनी करीत ८ जुन रोजी नारायणगड येथे होणार्या विशाल सभेला अंमळनेर परिसरातील घराघरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अवाहन केले.
पुणे येथून धामणगाव – अंमळनेर मार्गे बीडला जात असताना गावोगावी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले . अंमळनेर येथे छोटेखानी स्वागताला मोठे स्वरूप येत मोठ्या संख्येने समाजबांधव एकवटला होता. गावात येताच ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. स्वागतसभारंभानंतर छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी समाजबांधवांना संबोधित केले ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळत नव्हते त्यामुळे समाजाची मुले नौकरी, शिक्षणापासून वंचित राहत होती, आता कुणबी नोंदी सापडल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. सगेसोयरे यांची मागणी बाकी आहे ती देखील मागणी पुर्ण करण्यासाठी माझ्या जिवाची बाजी लावीत आहे, आणि हे मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, भले यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर असे सांगत मराठा समाजाने एकत्र येणे काळाजी गरज आहे. झालेली एकजुट फुटु देऊ नका, लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाच्या प्रचाराला जाऊ नका, कोणाला मतदान करा हे सांगणार नाही परंतु ज्याला पाडायचेय त्याला ईतक्या मताने पाडा की, त्यांच्या पाच पिड्या निवडणुकीत कोणी उभा राहीले नाही पाहिजे. पाडण्यात देखिल मोठा विजय असतो असे सांगितले. या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.

error: Content is protected !!