ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

आता अवधी नाही; सगेसोयरेच्या मागणीवर मनोज जरांगें पाटील ठाम, सरकारला दिला इशारा

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

आता अवधी नाही; सगेसोयरेच्या मागणीवर मनोज जरांगें पाटील ठाम, सरकारला दिला इशारा

मुंबई (प्रतिनिधी):-०मराठा आरक्षणावर आज राज्याच्या दोन्ही सभागृहात एकमतान ठराव मंजूर करण्यात आला. नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहेत. सगेसोयरेची मागणी मान्य करून ओबीसीतूनच आरक्षण द्या अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

सरसरट मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गोर गरीब मराठ्यांना आंदोलनाशीवाय पर्याय नाही. सरकारला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की. मराठा समाज आमच्या न्यायासाठी लढत आहे. सरकारने दिलेलं आरक्षण आम्ही स्वीकारलं आहेच, पण मूळ मागणी ओबीसी मधून आरक्षणाची आहे. त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम नक्की?
विधीमंडळ अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगें यांच्याविधानांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर जरांगेंनी भुजबळांवर सडकून टीका केली. त्यांनी विचार केला असता तर वातावरण इतकं बिघडलं नसतं. मात्र त्यांनी मराठा समाजाविरोधात जी भूमिका घेतली, त्यामुळे ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम होणार हे नक्की, अशा शब्दात त्यांनी त्याचा समाचार घेतला. त्यांच्यावर कोणीही हल्ला करणार नाही. मात्र त्यांना स्वतःचा स्वार्थ साधणं एवढंच कळतं.

60-70 वर्षे वेळ घेणार का?
सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं, पण मूळ मागणीचं काय? अजून 60-70 वर्षे वेळ घेणार का? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. सरकारला आम्ही दोन ते तीन वेळा वेळ दिला आहे. मात्र सरकार आमच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलंय एवढं आपल्याला समजतं.सरकारने सगेसोयरेंसंबधी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुशे आमचं उद्या सगळं ठरणार आहे. आता सरकारला अवधी नाही. वा रे मराठ्यांचे मंत्री, असा टोला लगावत त्यांनी आता मराठा समाजाने चूक करू नये.

आता एकही मराठा मागे हटणार नाही
सगेसोयरे बाबत समाजाची स्पष्ट भूमिका आहे. अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. लढण्यासाठी सज्ज आहोत. उद्या मराठा समाजाची तातडीची बैठक आहे, त्या आधी कोणीही कोणतंही आंदोलन करू नका अशी विनंती त्यांनी केली आहे. उद्या आपण कायम आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत.100-150 जणांना लागणारं आरक्षण दिलं त्यासाठी कौतुक सुद्धा केलं. अंमलबजावणी झाली असती तर अख्खा महाराष्ट्र गुलाल घेऊन गेला असता. जे धोकादायक आहे तेच नेमकं दिलं गेलं आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

error: Content is protected !!