ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

मुंबई (प्रतिनिधी ):-: पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपने संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ‘नरेंद्र मोदी का जहाँ जन्म हुआ है, उसी के पास औरंगजेब पैदा हुआ था, इसलिए औरंगजेबकी मानसिकता के साथ हमारे उपर हमला होता है’, असं वक्तव्य संजय राऊतांनी बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केलं होतं. या भाषणाची सीडी भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे जनप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (4) चे आणि आदर्श आचरसंहितेचं उल्लंघन असल्याचं भाजपने त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.

कलम 125 दोन समुदायात द्वेषाची भावना तयार करणे, यात 3 वर्षांचा कारावास आहे. तसंच भादंविच्या 153 अ, 153 ब आणि 499 या कलमांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन या सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांच्या निकालांचा दाखलाही तक्रारीत जोडण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे बोलल्याने तेही या गुन्ह्यातील भागीदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तात्काळ पंतप्रधानांची माफी मागावी, असे निर्देश द्यावेत. तसंच संजय राऊत यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पत्रावर अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे आणि संजय मयुख या भाजप नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!