सोलापूर संपादक – महेश पवार
प्रतिनिधी – संजय कुंभार
दक्षिण सोलापूर प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीने मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालय व मंद्रूप पोलीस ठाणे यांना शेतकर्यांच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
पाऊस कमी पडल्याने रब्बी व खरीब हंगामा कोरडे गेले असुन दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पेरणी करण्यात आले असुन पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची उगवण झाली नाही.शेतकरीवर्ग समवेत च जनावरांच्या ही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाले असुन शासनाने लवकरात लवकर जनावरांवर साठी चारा छावणीचं व्यवस्था करावी.
तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज घेतलेलं असून त्यांचे कर्ज शासनाने तात्काळ माफ करावे व संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
शासनाने शेतकरी वर्गाच्या समस्यांचे आठ दिवसात नाही विचार केल्यास दक्षिण सोलापूर प्रहार संघटनेच्या वतीने सर्व शेतकऱ्या समवेत संपूर्ण जनावरे दक्षिण अप्पर तहसील कार्यालयात बांधण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष निरंजन ख्याडे
यांनी दिला.या विविध मागण्यां संदर्भात मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार तसेच मंद्रूप पोलीस ठाणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष निरंजन ख्याडे, उपाध्यक्ष समर्थ गुंड, कार्याध्यक्ष तायाप्पा कोळी, रुग्णसेवक रमेश कुंभार, मंद्रूप शहराध्यक्ष प्रकाश वाघमारे,शेतकरी नांगनाथ कुंभार , मल्लिकार्जुन नंदुरे,गोटू अडोळे, विजय म्हेत्रे,महेश कांबळे, वकील बंडगर, शिवकुमार परीट, अंबान्ना काशिवंत, सिद्धाराम काशिवंत, गणेश कोळी, कट्याप्पा काळे, शिवानंद कांबळे, इराप्पा काळे, रफिक नदाफ, सलीम नदाफ उपस्थित होते.