ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

उर्जामंत्री नितीन राऊत‌ यांचे मंत्रिपद धोक्यात. .

उर्जामंत्री नितीन राऊत‌ यांचे मंत्रिपद धोक्यात. .

🔸अशोक काळकुटे | संपादक

राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं मंत्रीपद धोक्यात आले आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्री पद जाण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची‌ हायकमांडसोबत बैठक होत आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारमध्ये राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. संजय राठोड यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर अजून एक मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. कारण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती मिळतेय. नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीज आज काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे बैठक होत आहेत.

दोन्ही नेते हायकमांडच्या भेटीला.

विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत पूर्वीपासूनच मिळत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी त्यावेळी दिली होती. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होते.

वीजबिलाच्या मुद्द्यावरुन घमासान.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीज बिलाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात विज बील आलं. त्याविरोधात मनसे आणि भाजपनं राज्यभर आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी आपण राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अद्यापही ठाम असल्याचं वक्तव्य 20 नोव्हेंबर 2020 रोजी केलं होतं. त्यावेळी आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करु, मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले होते. पण पुढे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफी देणार असं आपण सांगितलंच नव्हतं असं म्हटलं. 100 युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असं आपण सांगितलं होतं. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असं राऊतांनी पुढे सांगितले.
त्यामुळे या मुद्द्यावर भाजपने सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी ऊर्जा खात्याला पैसा दिला जात नसल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला होता. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक ठिकाणी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आल. कुठल्याही परिस्थितील वीज बिल भरु नका, असं आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांची मोठी कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हा प्रश्न हाताळताना नितीन राऊत कमी पडले, अशी राजकीय वर्तुळात चर्चाही सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता राऊत यांच्याकडील ऊर्जा खातं काढलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!