गेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटला
पाणीटंचाईच्या काळात लाखो क्युसेक्स पाणी वाया
माळ्याच्या वस्तीत घुसले पाणी
गेवराई – गेल्या पंचवीस दिवसा पासुन पैठणच्या उजव्या कालव्यात अंत्यत कमी प्रमाणात जायकवाडी धरणातून पाण्याची पातळी झालेली आहे.परिणामी पाण्याचे स्रोत असलेल्या विहीर बोअरवेल यांच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने घट झालेली आहे.जनावरे,शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पैठणच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.मात्र कालव्यातील पाणी वितरीका फुटुन वाया जाते,तर आज गुरुवार दि २६ एप्रील रोजी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावाजवळ माळ्याचा ओढा म्हणुन ओळख असलेला परीसरात उजवा कालवाच फुटला.या मधुन लाखो कुसेस पाणी वाया गेले आहे.अचानक कालवा फुटल्याने जवळील शेतवस्तीवर देखील पाणी घुसले व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या परीसरात शेत वस्तीवरील लोंकात भितीचे वातावरण पसरले आहे.हे पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली आहे.कालवा फुटल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह गुळज येथुन बंद केला असल्याचे समजते मात्र,जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.याच कालव्यावर सी आर चार म्हणून सांडवा पर्याय आहे.पण त्याचे दरवाजे वर खाली घेण्याची कसलीही यंत्रना येथे सज्ज नाही व त्याची देखभालीसाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी सुविधा असत्या तर पाण्यावर नियंत्रण करता आले आसते असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.