ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजूर म्हणून आहे ,ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही.- पालकमंत्री धनंजय मुंडे

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजूर म्हणून आहे ,ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही.- पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड (प्रतिनिधी):-येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा अग्रीम जमा करण्यात येणार आहे . जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रीम जमा नाही झालं तर, मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही. असा शब्द आणि विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ते बीडमध्ये कृषी विभागाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, बीड जिल्ह्याची ओळख ही वारंवार मागासलेला जिल्हा, ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून केली जात आहे. मात्र ही ओळख कुठेतरी आपल्याला मोडायची आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मागासलेपणाची आणि ऊसतोड मजूर म्हणून असणारी जिल्ह्याची ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही. असा प्रण धनंजय मुंडे यांनी केलाय.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, आज जर शेतकरी संकटात असेल तर कृषीमंत्री म्हणून मी दिवाळी कशी साजरी करणार? मी देखील शेतकऱ्याचं पोरगा आहे. शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे मला चांगलं माहित आहे, जाणीव आहे. त्यामुळे कोणी वेगवेगळे प्रचार करतील, मोठमोठ्या सभेतून आरोप करतील, काय झालं पिक विम्याचे ? असं म्हणतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

1998 ला जर कोणी पिक विमा बाबत सांगितले असेल तर अटलजींच्या समोर माझे वडील स्वर्गीय पंडित आण्णा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समोर पिक विमा बाबत सांगितलं होतं. आणि त्यानंतर पिक विमा लागू झाला. एवढंच नाही तर मोझ्याक बाबतीत पंचनामे झालेत. त्यामुळे यावर देखील अंतिम निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत.

error: Content is protected !!