ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक 

वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक
गेवराई | प्रतिनिधी;-ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता फाशी दिली होती. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी 23 मार्च दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आर . के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात  आली . भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं असे प्रतिपादन प्रा. आर .के. चाळक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पार्थ प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता चाळक व आर के पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आर. के. चाळक उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी भगतसिंह राजगुरू सुखदेव या वीर क्रांतिकारी शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांना वीर क्रांतीकारी भगतसिंह राजगुरू सुखदेव यांच्या कार्याविषयी ओळख करून देश प्रेम जागृत व्हावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शेवटी आभार सुनील चौधरी  यांनी मानले . आणि सूत्रसंचालन  सहशिक्षिका कोमल गौंड यांनी केले.
————————————
चौकट बोल्ड
23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. शहीद दिवस म्हणून ओखळला जाणार हा दिवस खरंतर भारतीय इतिहासासाठी एक काळा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.
प्रा. आर. के. चाळक
error: Content is protected !!