ब्रेकिंग न्युज
सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धस

कृष्णा काठच्या नागरिकांना स्थलांतररसाठी आवाहन….

पूरप्रवण भागातील नागरिकांनी जनावरे, आवश्यक साहित्यासह त्वरित स्थलांतरीत व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

नागरिकांनी स्थलांतरासाठी प्रशासनाला सहकार्य करावे
कृष्णा खोऱ्यातील पूरपरिस्थिती हळूहळू तीव्र व गंभीर होत आहे. त्यासाठीच्या उपाययोजना प्रशासनाकडून कालपासून सुरु करण्यात आल्या आहेत. नवजा जिल्हा सातारा येथे चोवीस तासात 731 मिली मिटर पाऊस झाला आहे. कोयना परिसरात 604 मिमि पाऊस झाला आहे. पहाटे 3 वाजेनंतर थोडीशी उघडीप मिळाली आहे. चोवीस तासांमध्ये कोयना धरणामध्ये 12 टीएमसी पाणी आले आहे. आज अंदाजे 18 टीएमसी पाणी कोयना धरणामध्ये येईल. त्यामुळे कोयना धरणातील विसर्ग वाढविण्यात येत आहे. तसेच धरणाच्या पुढील गावांमध्ये पावसाचा जोर आहे. निसर्ग आपल्याला थोडीशी सवलत देईल अशी अपेक्षा आहे, परंतू कोणत्याही परिस्थितीत जी नेहमी संकटात असलेली गावे आहेत त्या गावांतील नागरिकांनी जनावरे, अत्यंत आवश्यक असलेले साहित्य घेऊन लवकरात लवकर स्थालांतरित व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
सध्या आयर्विंन पूल येथे पाणी पातळी 40 फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळ पर्यंत आणखी 10 ते 12 फुट वाढण्याची शक्यता आहे. सांगली आयर्विन पुलाखाली पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाईल. त्यामुळे सांगली शहरातील आवश्यक त्या सर्वांचे स्थलांतरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. असे सांगून जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनधी, नगरसेवक, सरपंच तसेच शासकीय यंत्रणा यांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन ताबडतोब हालचाल करावी. कोयना व वारणा धरणातील सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्व ती माहिती घेण्यात येत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रशासनाशी सतत संपर्क असून त्यांना विसर्ग वाढविण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, धरण क्षेत्रात व धरण क्षेत्राबाहेर फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही खूप पाऊस पडला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते त्यामुळे वेळीच नदी काठच्या गावांतील नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर करणे हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. एनडीआरएफची टीम कामाला लागली आहे. परंतु बोटींची वाट न पाहता सध्या सुरु असलेल्या वाटांवरुन नागरिकांनी स्थलांतरण व्हावे. सर्वांची काळजी घेण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येईल. चिंता करु नये व प्रशासनाला सहकार्य करावे .

error: Content is protected !!