नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी आखाड्याचे प्रमुख महंत हरीगिरीजी महाराज, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दादाजी भुसे, कारखान्याचे चेअरमन आणि खा. हेमंतजी गोडसे, उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री मा.तरूण राठीजी, आमदार मा. सौ. देवयानी फरांदे, मा.आ.हिरामण खोसकर यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळेस महसूल मंञी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रातील उत्तुंग यश संपादन करण्याचे मुलमंञ त्यांनी यावेळेस दिले. सहकार वाढला पाहिजे, टिकला पाहिजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्य जीवनात आनंद निर्माण करण्याचे त्यांना दोन पैसे मिळवून देण्यचे काम याठिकाणी कारखानदारी झालेले आहे असे मत महसूलमंञी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.