ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

डॉ. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशनबद्दल सांगू नये, आम्हाला मुका मार देता येतो

 

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंती एकनाथ शिंदे यांना टोला लागलेला आहे. – डॉक्टरांना प्रश्न विचारा, वीर सावरकर कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले? हे आता फोन करून विचारा, ऑपरेशनबद्दल आम्हाला सांगू नका, आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा, तुम्हाला मुका मार बसल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे.

राऊत म्हणाले की, डॉक्टरकी महाराष्ट्रात पायलीला ५० मिळत असतात. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळतेय हा देशाचा अनुभव आहे. अशाप्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना डॉक्टरकी कशी देता? तुमच्या कोणत्या फाईली अडकल्या आहेत म्हणून हे करावे लागते. गेल्या काही वर्षात हा प्रकार वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:वरच एक शस्त्रक्रिया करायला हवी. सामान्य जनतेने मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला बहुतेक या महान कार्याबद्दलच त्यांना डॉक्टरेट मिळाली असावी.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सरकार कोसळेल असं विधान केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जयंत पाटील बोलले ते खरे आहे. जर कायद्याने सर्वकाही होणार असेल तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरेल आणि सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!