ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारनेला प्राधान्य दिले-ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे

वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारनेला प्राधान्य दिले-ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे
बीड प्रतिनिधी;- वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारनेला प्राधान्य दिले आणि म्हणूनच अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि विज्ञानाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, अधोगतिकडून प्रगतीकडे आणि असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणाऱ्या वारकरी धर्माची भगवी पताका आजही डोलाने फडकत आहे असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांनी केले. गणेश नगर बीड येथे शिवजयंती व संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बीजे निमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवातील चौथे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते. धर्माचे पालन। करणे पाखंड खंडन।। हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम।। या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील अभंगावर चिंतन करताना ते म्हणाले कि वारकरी संतांनी धर्मचिकित्सा आणि धर्म शुद्धीकरणाला प्राधान्य दिले. धर्माच्या नावाखाली चालणारा खोटेपणा, लबाडी, दांभिकपणा, भोंदूगिरी, भाकडकथा, चमत्कार, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विधी-निषेध, शुभ-अशुभ, नवस-सायास, उपास-तापास (एकादशी सोडता) भेदाभेद, खुळचट कल्पना, अनिष्ठ रूढी, प्रथापरंपरा, चालीरीती या धर्मातील पाखंडाचे जोरदार खंडन वारकरी संतांनी केले, आणि त्यासाठी प्रसंगी कोणाचीही भीड न बाळगता शब्दरूपी तीक्ष्ण शस्त्रे हाती घेऊन या पाखंडांवर प्रखर हल्ले चढवले. धर्म लोकांसाठी असतो लोकं धर्मासाठी नसतात. त्यामुळे धर्माच्या आडून होणारं शोषण, मिळवणूक, लुबाडणूक करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधातील बंड म्हणजे वारकरी धर्म. प्रगत व विज्ञानवादी विचारांच्या व तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून प्रगत समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वारकरी संतांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. न्याय समता स्वातंत्र्य, बंधुता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता ही मूल्य वारकरी संतांनी समाजात रुजवली आणि याच मूल्यांवर आधारित अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवरायांनी केले हे वारकरी संतांच्या शिकवणुकीचे फलित होते असं ते पुढे बोलताना म्हणाले. याप्रसंगी पत्रकार अनंत घिगे साहेब, ह.भ.प. भीमराव म. यादव, मनोज म. बोटे, वाल्मीक म. चाटे, किसन म. माने, वैभव म. येडे, शंभू म. धांडे, चंद्रकांत म. शेळके भीमाशंकर म. खटाने यांच्यासह गायक, वादक, टाळकरी व भावी भक्त उपस्थित होते.
error: Content is protected !!