ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

*तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्मलेल्याना सामान्यांचे दुःख काय कळणार* — *बजरंग बप्पा सोनवणे* ————————————

 

बीड (गेवराई) :- मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो त्यामुळे शेतकऱ्याचा पुत्र असल्याने मला सर्वसामान्यांच्या वेदना माहित आहेत परंतु जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले त्यांना सामान्य शेतकरी शेतमजूर यांचे दुःख कसे समजू शकेल ? प्रश्नच माहित नसतील तर त्यांची सोडवणूक होईल का ? असा प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे मतदारांशी संवादादरम्यान कोणाचेही नाव न घेता उपस्थित केला.

यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते बदामराव आबा पंडित , राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे, शिवसेनेचे युवा नेते युद्धजीत दादा पंडित , माजी सभापती पंढरीनाथ लगड हे उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव, बागपिंळगाव कॅम्प, गोपळवस्ती (बेलगांव), बेळगाव, रामनगर तांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे गावातून मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की ; हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आणि रास्त भाव देण्यात अपयशी ठरलेले आहे. या सरकारने निवडणुकी पूर्वी दिलेली आश्वासने देखील पूर्ण केलेली नाहीत . तसेच मराठा आणि ओबीसी बांधवांची आरक्षणाची रास्त मागणी असताना देखील ते हा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत . खा प्रीतम मुंडेंवर आरोप करताना ते म्हणाले कि जिल्ह्यातील असंख्य गावात त्या आल्याच नाहीत असे मतदारच आता सांगत आहेत आता पर्यंत खासदार कधी गावकऱ्याना दिसल्या नाहीत किंवा गावात आलेल्या नाहीत ? मग त्यांनी सांगत असलेला विकास कुठे झाला ? त्यांचा विकास निधी कुठे गेला ? या प्रश्नांची उत्तरे त्या कधी देणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे म्हणून खऱ्या अर्थाने विकास पाहिजे असेल तर तुतारीधारी माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले

यावेळी अशोक शेंडगे, बाबासाहेब कांबळे, बाबासाहेब सगळे, भीमा टाले, पिंगळे मामा, नामदेव कांबळे, रामप्रसाद राऊत, सखाराम मुगटवार आणि गावकरी सोबत होते.

error: Content is protected !!