शासनाच्या नियमामुळे शेतकरी हैराण.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️दिपक मापारी | रिसोड.
तालुक्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाविषाणूने पुन्हा एकदा उचल खाली असून जनतेचे जगणे हैराण करून सोडले आहे. ग्रामीण भागात सुद्धा दररोज बाधि बाधिताच्या आकड्यात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक भयग्रस्त चिंताग्रस्त ,झाले आहेत.
आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने सरकारने संचारबंदी जाहीर केलेली आहे. कोरोना या आजारामुळे राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत..
हातात आलेले उन्हाळी कलिंगड, भाजीपाला अशा पिकांचे लॅकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. किरकोळ रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील खरेदीला ग्राहक नसल्याने कवडीमोल दर देवून विक्री करण्यात शेतकरी हतबल झाला आहे. तर अनेक ठिकाणी फळ, भाजीपाला, फेकून देण्याची पाळी आलेली आहे..
*दिवसेंदिवस बदलणाऱ्या नियमामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडत आहे. त्यामुळे लघु व्यवसायिक व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोरोना संकटातील नियमाचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी
बेलखेडा येथील युवा शेतकरी गणेश देव्हडे यांनी केली आहे.