लातूर येथील पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना न्याय आणि त्वरित संरक्षण देण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️लातुर | प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन घटना निदर्शनास आणुन दिली.
माँसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीबाई यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात १२ मार्च २०२१ रोजी दिवसाढवळ्या कोपरा (किनगांव) ता. अहमदपूर जि. लातूर येथील एका भगिनीवर अनन्वित अत्याचार केले गेले होते.
यानंतर त्या नराधमांनी त्यांचे लागेबांधे वापरून त्या गरीब, असाह्य निर्भयावर व तिच्या कुटुंबातील सदस्यांवर खोट्या ॲट्रॉसिटीसह इतर केसेस दाखल केल्या. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा कडुन निवेदन देऊन पुढीलप्रमाणे मागणी करण्यात आली आहे;
१. निर्भया व तिच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात टाकलेल्या खोट्या केसेस तत्काळ रद्द कराव्यात.
२. निर्भयावर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे.
३. निर्भयाला अमानुषपणे वागणूक देणाऱ्या खाकीतल्या भक्षकांना तत्काळ निलंबित करणे.
४. निर्भया व तिच्या कुटुंबीयांना त्वरित पोलीस संरक्षण देणे.
५. शासनाने निर्भयाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे.
आपल्या मार्फत शासन प्रशासनास निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आपण संवेदनशीलपणे यावर ७ दिवसाच्या आत कारवाई कराल अशी अपेक्षा आहे; अन्यथा लोकशाहीत असणाऱ्या संवैधानिक अस्त्रांचा वापर करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२. महिला व बालकल्याण मंत्री
३. गृहमंत्री
४. पालकमंत्री, लातूर
५. राष्ट्रीय महिला आयोग
६. राज्य महिला आयोग यांना देखील पाठवण्यात आले आहे.