कोरोनाने लातुरात एकाच दिवशी ५० जणांचा मृत्यु.
🔸अशोक काळकुटे | संपादक
▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थांबायला तयार नसून रविवारी (दि.१८) तब्बल १ हजार ८१३ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ५० जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान लातूर जिल्ह्यात उच्चांकी मृत्यू नोंदवण्यात आल्याने चिंता वाढली आहे. मागच्या दोन दिवसांपुर्वी १ हजार ६३४ आरटीपीसीआर तर ४ हजार १३ रॅपीड अँटीजन चाचण्या करण्यात आल्या होत्या.
आरटीपीसीआरमध्ये ३३३ तर रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये १ हजार १९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णसंख्येत लातूर शहरातील आकडा अधिक आहे. जिल्ह्यात आजवर ५५ हजार ३७१ जणांना कोरोना बाधा झाली. तर ३८ हजार २८८ जण कोरोनातुन बरे झाले आहेत. सध्या १६ हजार १४९ जणांवर उपचार सुरु असून आजवर ९ ३४ जणांचा झाला. दरम्यान स्मशानात अंत्यविधीसाठी कित्येक तास वाट पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.