धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा आंदोलनांवर उपस्थित केला प्रश्न
मुंबई(प्रतिनिधी) :- राज्याच्या आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा मुद्दा उचलण्यात आला. आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांंनी सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरत सरकारला आशा सेविकांची कदर नाही, असा हल्ला बोल करत आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
मुंबईतील आझाद मैदान येथे आशा सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे. यावर सरकारने आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये केली.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबई येथे सुरू झाले. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च पर्यंत चालू राहणार आहे. आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा मुद्दा उचलण्यात आला.