ब्रेकिंग न्युज
आम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवलेमहायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवर

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेला 10 मिनिटे वेळ वाढवून मिळणार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेला 10 मिनिटे वेळ वाढवून मिळणार

पुणे (प्रतिनिधी):-10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना दहा मिनिट एक्स्ट्रा मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि ते नीट समजून घेण्यासाठी वेळ वाढवून मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

या निणर्यामुळे मुलांना फायदा होणार आहे. या पूर्वी परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तसेच परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी केल्या जात होते.

10वी आणि 12 वीच्या परिक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून या परीक्षेची जोरदार तयारी सुरु आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे.

या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात 11 वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना 10.30 वाजता दालनात हजर राहावे लागणार तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार असल्याने 2.30 वाजता हजर राहावे लागणार आहे. तसेच 11 च्या पेपरला 2 ऐवजी 2.10 असा वाढीव 10 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

बोर्डाच्या या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांना देखील या परीक्षेची काळजी असते. पूर्वी मुलांना उत्तर पत्रिका नीट वाचून समजून घेता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते. मात्र पेपर फुटीच्या घटना घडल्यामुळे निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. अशात विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून पेपर सॉल्व करण्यास उशीर होत होता. मुलांना वेळ कमी पडत असल्याचे लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी 10 मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे.

error: Content is protected !!