ब्रेकिंग न्युज
पोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!शिक्षण विभागाला बदनाम करणाऱ्या विजय जाधव यांचा शिक्षक संघटनांकडून जाहीर निषेधवारकरी संत विचार महापरिषद महाराष्ट्र बहुउद्देशीय संघटनेची स्थापनापत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !तरूण पिढीने मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेचौंडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Lok Sabha Election 2024: ‘…तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू’, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

Lok Sabha Election 2024: ‘…तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू’, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यातच देशात सात टप्यात तर राज्यात पाच टप्यात निवडणूक पार पडणार आहे. यातच बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील जे संवेदनशील गाव आणि बूथ आहेत, त्या गावात जाऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे बैठक घेऊन आढावा घेत आहेत.

बीडच्या लिंबागणेश गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान फेव्हीस्टिक टाकून ईव्हीएम मशीन खराब करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्यात आली. यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज बीडच्या लिंबागणेश गावांमध्ये बैठक घेत आढावा घेतला आहे.

”जर लोकशाहीला मारक अशा घटना घडल्या तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल”, असा इशारा यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आढावा बैठकीतून दिला आहे.

दरम्यान, देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्याचे २० मे रोजी, सहाव्या टप्प्याचे २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे.

तसेच राज्यात पहिला टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर येथे मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल. तिसरा टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होईल. तर पाचवा टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होईल.

error: Content is protected !!