ब्रेकिंग न्युज
आ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखीपोकलेन मशिनमुळे पारंपरिक पद्धतीने क्रेनच्या सहाय्याने विहिर खोदकाम कामाला घरघर :-  डॉ.गणेश ढवळेजातीपातीचे पाहण्यापेक्षा, जिल्ह्याच्या मातीला विकासाचे वैभव द्या  –  पंकजाताई मुंडेमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ऐतिहासिक सायक्लोथाॅन सायकल व मोटरसायकल रॅली वडवणी शहरातून संपन्न…सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे जाणवले धक्के

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे जाणवले धक्के

नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. गुरुवार सकाळी सव्वासहाच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रत ४.२ एवढी मोजली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्हातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हात जाणवले असून प्रशासनाकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रता जास्त असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक देखील घराबाहेर पडले.

नांदेड शहरासह अर्धापूर , भोकर , हदगाव , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. काही गावातील घरांच्या भिंतींना देखील तडे गेले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी, वसमत, औंढा यासह हिंगोली तालुक्यांतील 200 पेक्षा अधिक गावांना या भूकंपाच्या धक्क्याने हादरे बसले. या भूकंपामुळे अद्याप कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.

error: Content is protected !!